सकाळ वृत्तसेवा
इ.स. १६८५ मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण महाराजांनी पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली.
विठुरायाच्या भक्तीचा प्रचार व वारकरी संप्रदाय दृढ करण्यासाठी त्यांनी पालखी सोहळा सुरू केला – जो आजही अविरत सुरू आहे.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुघल अराजकता पसरली होती. यात्रेकरूंना उपद्रव सहन करावा लागत होता.
नारायण महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांना पत्र लिहून यात्रेकरूंच्या सुरक्षेची मागणी केली होती.
राजाराम महाराजांनी देखील सकारात्मक उत्तर देऊन यात्रेकरूंना सुरक्षिततेची हमी दिली होती.
मुघल सैन्याचा त्रास वाढतच गेला. यात्रेकरूंच्या मार्गात अडथळे आले.
तपस्वी संत असूनही नारायण महाराजांनी शस्त्र उचलले आणि सांगुर्डी येथे मुघल सैन्याचा पराभव केला.
संत असूनही धर्म व भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.