Aarti Badade
अति मऊ किंवा कडक उशीमुळे मान आणि पाठीच्या कण्याचा समतोल बिघडतो.त्यामुळे पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी होऊ शकतात.
कणा लांबलचक आणि लवचिक असतो, तो मानेशी सरळ रेषेत (aligned) असावा लागतो. यामुळे संपूर्ण शरीरावर ताण न बसता योग्य पोस्चर टिकून राहते.
चुकीच्या उशीमुळे डोकं उंचावते आणि मेंदूकडे रक्तप्रवाह कमी होतो.यामुळे सकाळी डोकं दुखणं, गरगर होणं किंवा जड वाटणं असा त्रास होऊ शकतो.
चुकीची उशी श्वसनप्रवाहात अडथळा आणू शकते.त्यामुळे शरीराचा नैसर्गिक फ्लो (Optimal Flow) बिघडतो.
झोपण्याची पोझिशन, गादी आणि उशी – हे सगळं एकत्र योग्य असणं गरजेचं.मान आणि कणा एका सरळ रेषेत असले पाहिजेत.
उशी न वापरता झोपल्यास कदाचित त्रास कमी होईल.पण जर मान आणि कणा अलाइन नसतील, तरीही त्रास होऊ शकतो.
उशी वापरायचीच असेल, तर ती ना खूप मऊ, ना खूप कडक असावी.लहान उशी किंवा हलकी घडी केलेली चादर वापरूनही योग्य समतोल साधता येतो.
उशी वापरणं चूक नाही, पण ती योग्य प्रकारे आणि आपल्या शरीराच्या रचनेनुसार वापरणं गरजेचं आहे. झोपताना ‘कणा आणि मान’ समरेषीय असणं गरजेच आहे.