Aarti Badade
पावसात कोथिंबीर खाल्ल्याने पचन सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.
कोथिंबीरमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस व ऍसिडिटी यांपासून आराम मिळतो.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे कोथिंबीर संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करते.
कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन A, C आणि K भरपूर प्रमाणात असतात.
कोथिंबीर बियांचे पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रित राहतो.
कॅलरीज कमी व फायबर जास्त असल्याने कोथिंबीर वजन नियंत्रणात ठेवते.
अँटी-बॅक्टेरियल व अँटी-इंफ्लेमेटरी गुण त्वचेच्या त्रासांवर उपयुक्त ठरतात.
कोथिंबीर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
कोथिंबीर स्वच्छ धुऊनच खावी आणि प्रमाणाबाहेर खाऊ नका.