Monika Lonkar –Kumbhar
सध्या देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे.
या वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.
परंतु, आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर ही उष्णतेचा परिणाम होतो.
वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीराला सतत घाम येतो.
या घामामुळे शरीराला सतत खाज येते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.
अंगावरील खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही एक चमचा हळद घ्या. त्यामध्ये, अर्धा चमचा दूध मिसळून अंगावर लावा. यामुळे, खाज कमी होईल.
अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने आणि कोरफडीचा गर मिसळा. नंतर, अंघोळ करा, यामुळे खाज येण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल.