सकाळ डिजिटल टीम
हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो आणि घाम येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील दुर्गंधीची समस्या वाढते आणि लोकांसमोर लाज वाटू शकते.
घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी लोक महागडे परफ्यूम्स वापरतात, पण त्याचा थोडा ही परिणाम होत नाही.
आयुर्वेदात घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी उपाय सांगितले आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी ३ ग्रॅम आवळे पावडर पाण्यासोबत घेणे शरीरातील उष्णता आणि घामाच्या वासापासून आराम देतो.
हा उपाय केल्याने शरीराला येणारा घामाचा वास कमी होतो.
कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.