Pranali Kodre
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ जानेवारी २०२५ पासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी सामना सुरू झाला आहे.
हा सामना कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना आहे.
या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने त्याच्या दंडाला काळी पट्टी बांधली होती.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलिया संघात त्याने एकट्यानेच ही काळी पट्टी बांधली होती.
युकेमधील डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार त्याने माजी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ऍशवेल प्रिन्स याच्या पत्नीला श्रद्धांजली म्हणून काळी पट्टी बांधली होती.
प्रिन्स आणि ख्वाजा चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांच्यातील कौटुंबिक नातेही चांगले होते.
प्रिन्स याची पत्नी मेलिसा हिचे डिसेंबर २०२४ च्या अखेरीस कर्करोगाने निधन झाले.
विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यातून कर्करोगाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र गुलाबी रंग दिसून येत आहे.
कर्करोगाच्या जनजागृतीसाठी या सामन्यातील तिसरा दिवसही पिंक डे म्हणून साजरा केला जाणार आहे.