सूरज यादव
पंढरपूरमध्ये वसंत पंचमीला श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.
माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी. वसंत ऋतूची चाहूल गालते म्हणून माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते.
परंपरेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा झाला.
वसंत पंचमीच्या आधी दोन-तीन दिवस मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगितली जाते. त्यानंतर वसंत पंचमीला शाही विवाह सोहळा होतो.
विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. चार टन फुले आणि १ टन उसाचा वापर केला होता.
विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूहून पोशाख आला. परंपरेनुसार हा सोहळा मंदिरात पार पडला.
वसंत पंचमीला पहाटे काकडा आरतीला विठ्ठलाला सोन्याच्या मुकूटाऐवजी पांढरे पागोटे घातले जाते.
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलाल उधळला जातो. पांढरा पोशाख आणि त्यावर गुलाल उधळण्याची परंपरा आहे.
वसंत पंचमी पासून रंग पंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा पोशाख घातला जातो. तसंच पूजेवेळी गुलाल टाकला जातो.