Shubham Banubakode
सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला उर्फ व्याघ्रगड हा सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेला, अत्यंत दुर्गम आणि अजिंक्य किल्ला आहे. शिवकाळात हा किल्ला शत्रूंना सहज गवसणारा नव्हता.
Vasota Fort
Esakal
औरंगजेबाने अनेक किल्ल्यांवर हल्ले केले; मात्र वासोट्यापर्यंत तो कधीच पोहोचू शकला नाही. इतका हा किल्ला दुर्गम आणि सुरक्षित होता.
Vasota Fort
Esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा जिंकल्यानंतर त्याला ‘व्याघ्रगड’ असे नाव दिले. वाघांचे वसतिस्थान आणि घनदाट जंगल यामुळे हे नाव अत्यंत संयुक्तिक ठरते.
Vasota Fort
Esakal
शिवकाळात वासोट्याचा वापर स्वराज्यद्रोह्यांना कैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. इंग्रज अधिकारीसुद्धा येथे कैदेत ठेवण्यात आले होते.
Vasota Fort
Esakal
पन्हाळा वेढ्यावेळी इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केल्याने शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून वासोट्याच्या तुरुंगात ठेवले होते.
Vasota Fort
Esakal
छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून जिंजीकडे जाताना प्रतापगड–वासोटा मार्गे गेले होते. हा किल्ला गुप्त हालचालींसाठी महत्त्वाचा ठरला.
Vasota Fort
Esakal
वासोटा हा ‘वनदुर्ग’ म्हणून ओळखला जातो. आजही येथे वाघ, बिबट्या, विविध पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती आढळतात.
Vasota Fort
Esakal
वासोटा किल्ला म्हणजे शिवरायांच्या शौर्याची साक्ष, इतिहासाचा जिवंत वारसा आणि निसर्गसौंदर्याचा अद्भुत अनुभव आहे.
Vasota Fort
Esakal
Maharashtra mysterious village
Esakal