पृथ्वीवरील स्वर्ग... छत्रपतींच्या मावळ्यांचं गाव, मुऱ्हा रायरेश्वर!

Sandip Kapde

सह्याद्री :

सह्याद्री पर्वतरांग ही निसर्गसौंदर्याने आणि जैविक संपत्तींनी परिपूर्ण अशी पृथ्वीवरील एक अनमोल देणगी आहे.

स्वर्ग :

पावसाळ्यात सह्याद्रीचे दरी–कडे हिरवाईने नटून एखाद्या स्वर्गीय भूमीसारखे भासतात.

भोर :

भोर तालुका देश आणि कोकणाला जोडणारा ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे.

वारसा :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला या मावळ भागातील मावळ्यांनी मन, तन, धन देऊन हातभार लावला.

सीमा :

पुणे, सातारा आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर रायरेश्वरचे विशाल पठार वसलेले आहे.

प्रवास :

रायरेश्वरला जाताना आंबावडे गावातील श्री नागेश्वराचे दर्शन हा प्रवास अधिक पवित्र बनवतो.

शौर्य :

संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राच्या रक्षणासाठी संकराजी नारायण पंतसचिव यांनी अद्वितीय कार्य केले.

शिडी :

रायरेश्वरच्या पठारावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिडी व कड्याकपाऱ्यांतून जाणारा चढाई मार्ग रोमांचक अनुभव देतो.

निसर्ग :

पठारावरून दिसणाऱ्या कृष्णा खोऱ्याचे हिरवेगार दृश्य मनाला प्रसन्न करणारे असते.

पाणी :

रायरेश्वरवरील गोमुखातून वाहणारे पाणी हे पठारावरील कुटुंबीयांच्या पिण्याच्या गरजा वर्षभर पूर्ण करते.

मंदिर :

रायरेश्वरच्या शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर हेमाडपंथी शैलीतील आकर्षक दगडी बांधकामासाठी ओळखले जाते.

फुलोत्सव :

पावसाळ्यात रायरेश्वर पठारावर उमलणारी विविधरंगी फुले आणि फुलपाखरे पाहणाऱ्याला खऱ्या अर्थाने निसर्गाचा उत्सव अनुभवायला मिळतो.

मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ अन् शिवरायांना अनुभवलेला शंभर वर्षे अजिंक्य किल्ला

suvarndurg fort

|

esakal

येथे क्लिक करा