दररोज वीरभद्रासन केल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात?

Monika Shinde

वीरभद्रासन म्हणजे काय?

वीरभद्रासन हा योगातील एक उभा आसन आहे. यात शरीराची स्थिती योद्ध्यासारखी असते, म्हणून याला ‘वॉरियर पोझ’ असेही म्हणतात.

शरीराला मजबुती मिळते

हा आसन रोज केल्याने हात, पाय, खांदे आणि पाठीला ताकद मिळते. स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो आणि शरीर मजबूत बनते.

संतुलन व स्थिरता वाढते

वीरभद्रासन केल्याने शरीराचे संतुलन सुधारते. मानसिक स्थिरता निर्माण होते आणि एकाग्रता वाढते.

हृदयासाठी फायदेशीर

ही योगमुद्रा रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यास चालना देते. हृदय मजबूत होण्यास मदत होते.

पाठदुखीपासून आराम

सतत बसून काम करणाऱ्यांना पाठदुखीचा त्रास होतो. वीरभद्रासन केल्याने पाठीच्या स्नायूंना बळ मिळते व दुखणे कमी होते.

मानसिक आरोग्य सुधारते

हा आसन केल्याने तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक शांतता अनुभवायला मिळते.

शरीर लवचिक बनते

दररोज सराव केल्यास सांधे व स्नायू अधिक लवचिक होतात. हालचाली सहज आणि आरामदायक होतात.

सातत्य ठेवा

वीरभद्रासन दररोज केल्याने संपूर्ण शरीर आणि मन यावर सकारात्मक परिणाम होतो. सातत्य ठेवा आणि निरोगी आयुष्य जगा.

भारत स्वतंत्र होण्याच्या १७ वर्षांपूर्वी सोलापूरने फडकवला तिरंगा!

येथे क्लिक करा