अनिरुद्ध संकपाळ
भारतीय संघाने आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी करत इंग्लंडविरूद्धचा चौथा कसोटी सामना 5 विकेट्सनी जिंकला.
भारताने पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यातील पहिला सामना गमावला होता. मात्र त्यानंतर पुढचे तीनही सामने जिंकून मालिका खिशात टाकली.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यातून कौटुंबीक करणाने माघार घेतली होती. त्यानंतर विराट कोहलीने संपर्ण मालिकेतून माघार घेत असल्याचे कळवले.
विराट कोहलीला नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. अनुष्का आणि विराटच्या या गोंडस मुलाचं नाव अकाय आहे. त्याचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यामुळे विराट देखील लंडनमध्येच होता.
दरम्यान, भारतीय युवा संघाने इंग्लंडविरूद्धची मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीने अभिनंदनाचे ट्विट केले.
विराट कोहली म्हणाला, युवा संघाचा जबरदस्त मालिका विजय; हिंमत, निश्चय अन् प्रतिकाराचं दर्शन घडवलं.