Sandip Kapde
शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास उत्सुकता वाटते.
त्याकाळी लोकांचे जीवनमान कसे होते, याबद्दल प्रश्न पडतात.
शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा आहार कसा होता, याची उत्सुकता आहे.
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण शोधत असतो.
शिवाजी महाराजांच्या काळात मिरची अस्तित्वात होती का, असा विचार येतो.
वरिष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी याबाबत 'भवताल' यूट्यूब चॅनलवर माहिती दिली.
शिवाजी महाराजांच्या काळात खाण्यात मिरचीचा वापर होत नव्हता.
मिरचीचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला होता.
प्राचीन काळापासून मेक्सिकोच्या प्रदेशात मिरचीची लागवड होत होती.
१५वे आणि १६वे शतकात पोर्तुगीज दक्षिण अमेरिकेत पोहोचले.
त्यांनी तिथून मिरचीसह अनेक वस्तू इतर भागात पाठविल्या.
मिरची भारतात शिवाजी महाराजांच्या काळात आली, पण तिचा वापर फारसा नव्हता.
मिरचीच्या आधी काळी मिरी, आलं आणि लसूण यांचा तिखटपणासाठी वापर होत असे.