सकाळ डिजिटल टीम
बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थात मीठ, साखर, गुळ घालू नये.
बाळाला शर्करा, कॅलोरीज आणि कार्बोहायड्रेट नैसर्गिक फळांमधून मिळू देत.
वरून साखर, मीठ, गुळ, मध दिल्याने भविष्यात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
द्राक्षे, शेंगदाणे, काजू, डाळिंबाचे दाणे घशात अडकू शकतात, त्यामुळे हे पदार्थ देणे टाळा.
मासे, सोयाबीन, अंड्याचा पांढरा भाग यांवर अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
या पदार्थांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाळाला एक वर्षापर्यंत देऊ नये.
बाटलीबंद रसाचा वापर टाळावा, कारण त्यात कृत्रिम रंग आणि साखर असू शकतात.
बाळाला ताजे आणि नैसर्गिक पदार्थ देणे अधिक सुरक्षित आहे.