Shubham Banubakode
आपल्याकडे ‘आपला हात जगन्नाथ’ ही म्हण सर्रासपणे वापरली जाते.
काही जण ही म्हण नकारात्मक अर्थानेही वापरतात.
पण या म्हणीचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये का?
खरं तर या म्हणीला ऐतिहासिक असा संदर्भ आहे.
पौरणिक कथेनुसार, द्वापरयुगात मालवाचे राजे इंद्रद्युम्न यांना पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर लाकडाचे ओंडके सापडले होते.
या ओंडक्याचं करायचं काय? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तप करुन नरसिंह देवाला प्रसन्न केले.meaning of aapla haat jagannath
नरसिंह देवाने या लाकडापासून विश्वकर्माच्या तीन वेगवेगळ्या प्रतिमा बनवण्यास सांगितले.
त्या प्रतिमा म्हणजे आजच्या जगन्नाथ मंदिरातील भगवान बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ यांच्या प्रतिमा होय.
ज्यावेळी या प्रतिमांची निर्मिती करायची होती, तेव्हा भगवान विष्णू हे सुतार रुपात प्रकट झाले.
त्यांनी या प्रतिमांपासून भगवानांच्या मूर्ती बनवणार असल्याचं सांगितलं.
पण जोपर्यंत मुर्तींचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत गाभाऱ्यात कुणीही प्रवेश करणार नाही, अशी अटही त्यांनी घातली.
त्यानंतर बरेच दिवस या मुर्तींचे काम सुरु होते. मात्र, एक दिवस राजाच्य पत्नीने गाभाऱ्याच्या दरवाज्याला कान लावला.
तिला कशाचाही आवाज ऐकू न आल्याने सुताराचा मृत्यू झाला, असं तिने राजाला सांगितलं.
जेव्हा राजाने गाभाऱ्याचे द्वार उघडले, तेव्हा मुर्तींचे हात बनवायचं राहिले होते. यावरून ओडिसात ही म्हण रूढ झाली.
भगवान जगन्नाथ हाताशिवाय विश्वाचा सांभाळ करतात, आपल्याला तर हात आहेत, त्यामुळे आपल्याला कोणतही काम अशक्य नाही. या अर्थाने आपला हात जगन्नाथ ही म्हण म्हटली जाते.