Sandip Kapde
मुंबईतील राजाबाई टॉवर हा ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. Rajabai Tower history
या टॉवरचे बांधकाम १८६९ साली सुरू होऊन १८७८ साली पूर्ण झाले.
राजाबाई टॉवरची उंची तब्बल २८० फूट आहे.
या टॉवरवर जाण्यासाठी १८० पायऱ्या चढाव्या लागतात.
टॉवरच्या शीर्षभागी आणखी ५२ पायऱ्या असून तिथून दूरवरचे दृश्य दिसते.
या इमारतीचे आराखडे प्रसिद्ध वास्तुविशारद सर एगल्बर्ट स्कॉट यांनी तयार केले.
प्रसिद्ध ब्रोकर प्रेमचंद रायचंद यांनी या इमारतीसाठी चार लाख रुपयांची देणगी दिली होती.
या इमारतीला प्रेमचंद रायचंद यांच्या आईच्या नावावरून 'राजाबाई टॉवर' हे नाव देण्यात आले.
टॉवरवरील घड्याळात दहा टन वजनाच्या १६ घंटा आहेत.
हे घड्याळ लंडनमधील लुण्ड अँड ब्लॉकूले कंपनीने तयार केले आहे.
या घड्याळातील घंटांचा उपयोग पाश्चात्य संगीत वाजवण्यासाठी केला जातो.
१८९१ मध्ये दोन पारशी तरुणींचा या टॉवरवरून पडून मृत्यू झाला.
त्या घटनेनंतर राजाबाई टॉवरच्या सर्वोच्च मजल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली.
या टॉवरच्या गॅलरीत विविध वेशभूषेतील आठ पुतळे आहेत.
राजाबाई टॉवरच्या गच्चीवरून मुंबईसह उरण आणि एलिफंटा बेटांचे देखील दर्शन होते.