Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर अत्यंत भव्यतेने पार पडला होता.
इतिहासात आपण याबद्दल अनेकदा वाचले आहे, पण त्या दिवशीच्या जेवणाच्या थाटाविषयी फारशी माहिती क्वचितच मिळते.
राज्याभिषेकासारख्या महान सोहळ्यात जेवणात काय वाढण्यात आले असेल, हा प्रश्न अनेकांना उत्सुकता निर्माण करणारा आहे.
शिवकालीन काळात सण-समारंभांमध्ये खास प्रकारचं पारंपरिक भोजन दिलं जात असे.
१६व्या-१७व्या शतकातील मिष्टान्नात पुरणपोळी (पु.मांडे), बासुंदी, कलाकंद आणि सुधारस यांचा समावेश असे.
त्यासोबत झणझणीत चटण्या - अमसूल, आवळा, ठेचा आणि कोशिंबीर, भरीत, भाकरी, थालीपीठ हे पदार्थ हमखास असायचे.
लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळी रात्री दूध-भाकरीचा आहार करत असत, हेही त्या काळात सामान्य होतं.
मात्र राज्याभिषेकाच्या दिवशी नेमकं काय मेनू होता, याचं उत्तर आपल्याकडे केवळ अंदाजावरच आधारित आहे.
श.वि. आवळसकर यांच्या "रायगडची जीवनकथा" या पुस्तकात यासंदर्भात सविस्तर उल्लेख सापडतो.
त्यात त्यांनी नमूद केलं आहे की, रायगडावर दहा दिवस सतत जेवणाच्या पंगती चालू होत्या.
प्रत्येक भोजन करणाऱ्या व्यक्तीस दक्षिणाही देण्यात येत होती. यावरून त्या सोहळ्याचा भव्यपणा लक्षात येतो.
इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्ससेंडेन याने त्याच्या डायरीत त्या काळात मराठी लोक कसे खात होते, याचे वर्णन केले आहे.
त्यानुसार, स्थानिक लोक डाळ-तांदुळावर लोणी घालून खायचे. म्हणजेच मुगडाळीची खिचडी हा प्रमुख प्रकार होता.
ऑक्ससेंडेनसाठी मात्र खास मांसाहारी जेवणाची वेगळी सोय करण्यात आली होती.
त्याला मुख्य सोहळ्यापासून दोन किलोमीटर दूर राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती, यावरून पाहुण्यांबाबतची दक्षता लक्षात येते.