Sandip Kapde
रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी दोन भव्य हत्ती आणले होते.
गडाचा बिकट मार्ग पाहता, हत्ती रायगडावर कसे आणले, हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला.
इंग्रज वकील हेन्री ऑक्सिंडेन यांनी राज्याभिषेकावेळी हत्तींबाबत वर्णन केले आहे.
दरबार संपल्यानंतर महाराजांची हत्तीवरून निघालेली मिरवणूक भव्य होती.
हत्तींसाठी रायगडावर पिलखाना बांधण्यात आला होता.
महाराजांच्या हत्तींमध्ये उत्तमगज, ऐरावत, बालसुंदर, महंकाळ, गजराज, शंभू प्रसाद, भवानी प्रसाद नंदराज, कर्पूरगौर, वीरभद्र, खंडेराव अशी नावं प्रसिद्ध आहेत.
हिरोजी इंदलीकर यांच्या रायगडावरील शिलालेखात हत्तींचा स्पष्ट उल्लेख आहे.
‘कुंभ’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ हत्ती असा आहे.
महाराजांकडे हत्ती कमी असले तरी ते प्रशिक्षित व युद्धासाठी सज्ज होते.
औरंगजेबापासून पळवून आणलेले हत्ती सिंहगडावर ठेवले गेले होते.
उपासमार होत असल्याने काही हत्ती मोघलांना परत देण्यात आले.
भारतात प्राचीन काळापासून हत्ती पाळण्याची आणि प्रशिक्षण देण्याची समृद्ध परंपरा आहे. इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.