भारतात कागद कधी आणि कसा आला? देशातील पहिले उत्पादन केंद्र कुठे झाले? पानांची कहाणी व्हाल थक्क...

Mansi Khambe

कागद

कागद हा एक अतिशय पातळ आणि हलका पदार्थ आहे जो विणकाम न करता बनवला जातो. पारंपारिकपणे तो जमिनीतील वनस्पती आणि कापडांपासून मिळवलेल्या तंतूंचे मिश्रण करून बनवला जात असे.

Paper Invention History

|

ESakal

इजिप्शियन पेपिरस

इतिहासात कागदासारखे दिसणारे सर्वात जुने वनस्पती-आधारित लेखन साहित्य इजिप्शियन पेपिरस होते. परंतु कागद बनवण्याच्या पद्धतशीर आणि व्यावहारिक पद्धतीचा पहिला पुरावा चीनमध्ये आढळतो.

Paper Invention History

|

ESakal

कै लुन

इतिहासकारांच्या मते, ही पद्धत पूर्व हान राजवंशाच्या काळात विकसित करण्यात आली होती. ज्याचे श्रेय सहसा शाही दरबारातील अधिकारी कै लुन यांना दिले जाते.

Paper Invention History

|

ESakal

इस्लामिक

लगद्यापासून बनवलेले हे नवीन साहित्य लेखन, चित्रकला आणि नाणेनिर्मितीसाठी वापरले जाऊ लागले. ८ व्या शतकात कागद बनवण्याचे तंत्र चीनपासून इस्लामिक जगात पसरले.

Paper Invention History

|

ESakal

पॅपिरस

जिथे पॅपिरसचा वापर हळूहळू कमी होत गेला. ११ व्या शतकापर्यंत ही कला युरोपमध्ये पोहोचली होती. जिथे प्राण्यांच्या कातड्या आणि लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या चर्मपत्राची जागा कागदाने घेतली.

Paper Invention History

|

ESakal

कागद गिरण्या

१३ व्या शतकात स्पेनमध्ये पाण्यावर चालणाऱ्या कागद गिरण्या स्थापन झाल्यानंतर ही प्रक्रिया आणखी पुढे गेली. नंतर १९ व्या शतकात युरोपमध्ये लाकडापासून कागद बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले.

Paper Invention History

|

ESakal

कागदाचे उत्पादन

ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाचे उत्पादन शक्य झाले. त्याची उपलब्धता वाढली. भारतात कागदाचे आगमन हे एका दीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेचे परिणाम होते.

Paper Invention History

|

Esakal

मध्य आशिया

चीनमध्ये विकसित झालेले कागद बनवण्याचे तंत्रज्ञान थेट भारतात पोहोचले नाही. ते प्रथम युरोपमध्ये गेले आणि तेथून मध्य आशियामार्गे हळूहळू १३ व्या शतकात भारतात पोहोचले.

Paper Invention History

|

ESakal

स्थानिक उत्पादन

या संपूर्ण प्रवासात कागद भारतात पोहोचण्यासाठी एक हजार वर्षांहून अधिक काळ लागला. कागद लोकप्रिय झाल्यानंतर अनेक वर्षांनी भारतात स्थानिक उत्पादन सुरू झाले.

Paper Invention History

|

ESakal

पहिले कागद उत्पादन केंद्र

देशातील पहिले कागद उत्पादन केंद्र उत्तर काश्मीरमध्ये स्थापन करण्यात आले होते. ज्याची स्थापना तेथील शासक सुलतान जैनुल आबिदिन यांनी केली होती.

Paper Invention History

|

ESakal

यांत्रिक साधन

हा कारखाना आधुनिक यंत्रसामग्रीवर आधारित नव्हता तर मर्यादित यांत्रिक साधनांचा वापर करत होता. सुमारे १० ते २० टक्के काम यंत्रांद्वारे केले जात होते. तर उर्वरित ८० टक्के काम मानवी श्रमाने केले जात होते.

Paper Invention History

|

ESakal

कागद कारखाना

उत्तर काश्मीरमधील हा कागद कारखाना सुमारे १४१७ इसवी सनाच्या सुमारास स्थापन झाला. सुमारे १४६७ इसवी सनापर्यंत कार्यरत होता. या उपक्रमाने भारतातील कागद उद्योगाचा पाया घातला.

Paper Invention History

|

ESakal

बलुचिस्तानला पाकिस्तानचं "हैदराबाद" का म्हणतात? ते पाकचं डोकेदुखी कसं बनलं?

Balochistan called Pakistan Hyderabad

|

ESakal

येथे क्लिक करा