कार्तिक पुजारी
१९९६ मध्ये ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये यूथ काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. ममतांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होण्याची इच्छा होती.
तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी त्यांचे निकटवर्तीय सोमेन मित्रा यांना पश्चिम बंगाल काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं होतं.
सोमेन मित्रा यांचे डाव्या विचारसरणीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. ममता बॅनर्जींना हे आवडणारं नव्हतं.
ममता बॅनर्जी आणि सोमेन मित्रा यांच्यामधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता.
१ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली. पश्चिम बंगालमधील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून त्याची ओळख आहे.
पक्षाची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या.
एका नव्या पक्षासाठी हा मोठा विजय होता. शिवाय ममतांनी आपली ताकद दाखवून दिली होती.