भारतात शेवटची जातीय जनगणना कधी झाली होती? बंद करण्यामागचं कारण काय?

Vrushal Karmarkar

मोठा निर्णय

केंद्रातील मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील जनगणनेत जातीय जनगणना समाविष्ट केली जाणार आहे.

Caste Census | ESakal

जातीय जनगणना

सरकारने ठरवले आहे की, जातींची गणना जनगणनेतच केली जाईल. गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत होते.

Caste Census | ESakal

शेवटची जनगणना

आता केंद्र सरकारने जनगणनेत जातीबद्दल विचारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती.

Caste Census | ESakal

सातवी जनगणना

ही स्वतंत्र भारताची सातवी जनगणना होती आणि आतापर्यंत ही देशाची एकूण १५ वी जनगणना मानली जाते. २०११ ची जनगणना दोन टप्प्यात करण्यात आली.

Caste Census | ESakal

जातीय जनगणना कधी?

यामध्ये भारताची एकूण लोकसंख्या १२१ कोटींपेक्षा जास्त नोंदवण्यात आली होती. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात शेवटची जातीय जनगणना कधी झाली होती?

Caste Census | ESakal

१९३१ मध्ये ब्रिटिश राजवटीत

भारतातील शेवटची संपूर्ण जाती-आधारित जनगणना १९३१ मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली होती. ही तीच जनगणना होती ज्यामध्ये पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी सर्व जातींचा तपशीलवार डेटा गोळा करण्यात आला होता.

Caste Census | ESakal

१९४१ ची जनगणना

यानंतर १९४१ ची जनगणना करण्यात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे ती अपूर्ण राहिली. स्वतंत्र भारतात १९५१ पासून फक्त अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांची गणना केली जात आहे.

Caste Census | ESakal

धोरण

त्यावेळी सर्वसाधारण वर्ग आणि मागासवर्गीय जातींची गणना केली जाणार नाही, असे धोरण आखण्यात आले. त्यामुळे जातीचा डेटा मर्यादित झाला. २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना करण्यात आली.

Caste Census | ESakal

जातीचा डेटा

परंतु त्यात गोळा केलेला जातीचा डेटा सरकारने सार्वजनिक केला नाही. कारण सुमारे ४६ लाख जातींची नावे आणि स्पेलिंगमधील फरकांमुळे डेटा पडताळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले जात होते.

Caste Census | ESakal

बाजीराव आणि मस्तानीचा अंत कसा झाला?

Bajirao and Mastani | ESakal
वाचा सविस्तर