संतोष कानडे
आयुर्वेदानुसार काही अन्नपदार्थांचे एकत्र सेवन हे विरुद्ध आहार मानले जाते, कारण त्यामुळे पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
दूध आणि आंबट फळे, उदा. संत्रे, मोसंबी, लिंबू एकत्र खाणे टाळावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
दूध आणि मासे यांचे एकत्र सेवनही विरुद्ध आहार मानले गेले आहे. दूध आणि मीठ एकत्र घेणे आयुर्वेदानुसार अयोग्य मानले जाते.
मध आणि तूप समप्रमाणात मिसळून खाणे टाळावे, असा उल्लेख आयुर्वेदातील काही ग्रंथांमध्ये आहे.
फळांसोबत जड दुग्धजन्य पदार्थ किंवा जेवणासोबत फळे खाण्याऐवजी योग्य अंतर ठेवणे अधिक फायद्याचे मानले जाते.
गरम अन्नासोबत अतिथंड पेये घेणे पचनशक्तीवर परिणाम करू शकते, असे आयुर्वेदात नमूद आहे.
वारंवार असे विरुद्ध आहाराचे सेवन केल्यास अपचन, अॅसिडिटी आणि इतर पचनविषयक तक्रारी वाढू शकतात.
ताजे, ऋतूनुसार आणि सहज पचणारे अन्न योग्य प्रमाणात खाण्यावर आयुर्वेद भर देतो.
आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी विरुद्ध आहार टाळून संतुलित आणि पचनास अनुकूल आहार घेणे महत्त्वाचे मानले जाते.