सकाळ वृत्तसेवा
शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याची अत्यंत शिस्तबद्ध रचना होती. घोडदळ आणि पायदळ हे दोन स्वतंत्र सैन्यप्रकार होते, आणि त्यांचे वेगवेगळे प्रमुख असत.
सरनौबत ही सैन्यातील सर्वोच्च पदांपैकी एक होते. मोहिमांची आखणी, सैन्याचे नियोजन आणि युद्धसज्जता यांची जबाबदारी त्यांच्यावर असे.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक सैनिकाला ठराविक पगार दिला जात असे. सरकारकडून मिळणाऱ्या घोड्यांवर बसणारे सैनिक बारगीर म्हणून ओळखले जात.
➖ २५ बारगिरांवर १ हवालदार
➖ ५ हवालदारांवर १ जुमलेदार (५०० होन पगार आणि पालखीचा मान)
➖ १० जुमलेदारांवर १ हजारी (१००० होन पगार)
➖ ५ हजारींच्यावर १ पंचहजारी
➖ सर्वोच्च पद – सरनौबत (४००० ते ५००० होन पगार)
सरनौबतांना केवळ जास्त पगारच नव्हे, तर मोहिमांच्या वेळी वेगळा सन्मान दिला जात असे. त्यांच्यासाठी विशेष सोयी-सुविधा आणि दरबारात मानाचे स्थान होते.
शिवकाळात सैन्याच्या पगाराचा हिशोब काटेकोरपणे ठेवला जात असे. युद्धसज्जता आणि मोहिमांसाठी पुरेसा निधी ठेवण्याची खास योजना असायची.
पायदळ आणि घोडदळ यांसाठी स्वतंत्र व्यवस्थापन होते. प्रत्येक पदानुसार ठराविक वेतन आणि जबाबदाऱ्या असत.
महाराजांच्या अचूक नियोजनामुळे त्यांच्या सैन्याला सक्षम नेतृत्व आणि भरभक्कम आर्थिक आधार मिळत असे. त्यामुळेच त्यांच्या काळातील सैन्यव्यवस्था अद्वितीय होती.