युद्धासाठी पेशव्यांना पैशांचा पुरवठा बारामतीमधून कोण करायचं?

सकाळ वृत्तसेवा

मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ

१७०७ साली औरंगजेबाचा अंत झाला आणि मराठ्यांचं स्वर्णयुग सुरू झाले, संभाजी महाराजांचे बलिदान, राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी स्वराज्य टिकवले, शाहू महाराजांनी साताऱ्याला गादी स्थापन करून मुघल सत्तेला आव्हान दिले.

peshwa | esakal

मराठ्यांची घोडदौड

बाजीराव पेशव्यांनी नर्मदेपलीकडे, नानासाहेबांनी अटकेपार मराठा साम्राज्य विस्तारले, महादजी शिंदेंनी दिल्लीवर वचक बसवला, पेशावर ते तंजावर मराठ्यांचा झेंडा फडकला.

Peshwa | esakal

धनशक्तीचा आधार

मराठा साम्राज्याच्या यशात सैन्याबरोबरच धनशक्तीचा मोठा वाटा होता. देशभर घोडदौड करणाऱ्या सेनेला सावकारांनी रसद पुरवली. पेशवाईत मराठा साम्राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले.

Peshwa | Sakal

सावकारांची ‘स्ट्रॉंग सिस्टीम’

शाहू महाराजांच्या काळात सावकारांचा उदय झाला, वैद्य, दीक्षित, पटवर्धन, भिडे, नाईक यांसारखे सावकार प्रसिद्ध होते. लढाईसाठी कधीही आर्थिक चणचण भासली नाही.

Peshwa | esakal

बाबूजी नाईकांचा उदय

बारामतीकर बाबूजी नाईक हे कोकणातील केळशी गावचे जोशी, केशव नाईक काशीत सावकारी करत होते, तर कृष्णाजी शाहूसोबत दक्षिणेत आले, शाहूंना राज्य मिळेपर्यंत नाईकांनी निधी पुरवला.

Peshwa | Sakal

नाईकांचा दबदबा

सदाशिव नाईकांनी देशभर पेढ्या स्थापन केल्या, बाळाजी विश्वनाथांनी आपली मुलगी भिऊबाई नाईकांना दिली, १७४३ साली बाबूजी नाईकांना बारामतीची जहागीर मिळाली.

Peshwa | Sakal

पेशव्यांचे आधारस्तंभ

पानिपतच्या पराभवानंतर बाबूजींनी माधवराव पेशव्यांना साहाय्य केले, रघुनाथरावांची मुलगी दुर्गाबाई नाईकांच्या मुलाशी विवाहबद्ध झाली, परशुरामभाऊ पटवर्धनांची मुलगीही नाईक कुटुंबात आली.

Peshwa | esakal

सांस्कृतिक योगदान

बाबूजी नाईकांनी कविवर्य मोरोपंतांना आश्रय दिला, बारामतीत कऱ्हा नदीकाठी वाडा बांधून मोरोपंतांना भेट दिला, १७८० साली बाबूजींचा मृत्यू झाला पण त्यांचे योगदान अजरामर आहे.

Peshwa | Sakal

वाड्याची पुनर्बांधणी

सरकारने बाबूजी नाईकांच्या वाड्याची पुनर्बांधणी केली, बारामतीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आला, बाबूजी नाईकांनी बारामतीला पहिली ओळख दिली.

Peshwa | esakal

'या' फळाचा रस डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

amla benefits | sakal
येथे क्लिक करा