Saisimran Ghashi
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा जाज्वल्य इतिहास! स्वराज्यावर औरंगजेबासह इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, म्हैसूर आदी शत्रूंचे संकट होते, पण त्यांनी सर्वांना समर्थपणे तोंड दिले.
परंतु, शंभूराजांचा पराभव शत्रूने नव्हे, तर स्वकीयांच्या फितुरीमुळे झाला. संगमेश्वर येथे मुकर्र्बखानाने त्यांच्यावर हल्ला केला आणि संभाजी महाराजांना जिवंत पकडले.
संगमेश्वर ते बहादूरगड प्रवासात त्यांना वाचवण्यासाठी पहिला हल्ला ज्योत्याजी केसरकर यांनी केला. त्यांनी धनगर मावळ्यांसह मुघलांवर तुटून पडले.
उणेपुरे शंभर मावळ्यांनी हजारोंच्या सैन्यावर हल्ला केला, पण संख्याबळ कमी पडल्याने युद्ध हरले. ज्योत्याजी केसरकरही रक्तबंबाळ होऊन कोसळले.
संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न रायाप्पा यांनी केला, पण मुघलांनी त्यांनाही ठार मारले. शेवटी औरंगजेबाने क्रूरपणे शंभू महाराज व कवी कलशांची क्रूर हत्या केली.
येसूबाई राणींनी रायगडावर संघर्ष सुरू ठेवला, पण पुन्हा फितुरीमुळे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. शाहू महाराजांना कैद करण्यात आले.
पंचवीस वर्षांनी शाहू महाराज परत आले. स्वराज्य पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान होतं. त्यावेळी त्यांना पहिलं साथ दिली ती ज्योत्याजी केसरकर यांनी.
शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखी व १८ कारखान्यांचा अधिकार दिला. आजही पुनाळ गावात ज्योत्याजी केसरकर यांची समाधी वीरगाथा सांगते.