Sandip Kapde
शिवकाळात मुख्य गावांत आठवड्यातून एकदा बाजार भरत असे.
त्या बाजारांत कापड, नारळ, विड्याची पाने, सुपाऱ्या, फळे-भाज्या आणि मांस यांची खरेदी-विक्री होत असे.
धान्याची विक्रीही बाजारात मोठ्या प्रमाणात होत असे.
अशा बाजाराच्या व्यवस्थेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीस ‘शेठ’ किंवा ‘श्रेष्ठिन’ म्हणत.
शेठाला सेवेसाठी भाडेमुक्त जमीन देण्यात येत असे.
नव्या बाजारपेठेला स्वयंपूर्ण होईपर्यंत सरकार करमाफीची सवलत देत असे.
बाजारपेठेला करमाफी देण्याचे धोरण शिवाजी महाराजांनी सुरू केले आणि पेशव्यांनीही पुढे चालू ठेवले.
बाजारपेठेचा विकास करणे हे शेठाचे मुख्य कर्तव्य असे.
मुख्य व्यापाऱ्यास दुकानदारांवर लादलेला कर गोळा करण्याची परवानगी असे.
शेठाला पोलीस आणि न्यायाधीशासारखी कामेही करावी लागत.
ग्रामपंचायतीचा सदस्य आणि मिरासदार म्हणून त्याला पेठेत राखीव घर व जागा दिली जात असे.
शेठाला बाजारातील विक्रेत्यांची यादी ठेवावी लागत असे.
जकात वसूल करण्याच्या कामात घाटपांड्याला शेठ मदत करी.
शेठाला स्थानिक अधिकाऱ्यांना प्रसंगी सहाय्य करावे लागे.
कधी कधी सरकारच्या सनदेनुसार नवी पेठ स्थापन केली जात असे.
“महाराष्ट्राचा इतिहास – मराठा कालखंड (भाग : शिवकाल १६३० ते १७०७)”
लेखक – डॉ. वि. गो. खोबरेकर