पुजा बोनकिले
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते.
डॉक्टरांच्या मते दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे असते.
अनेक लोकांना पाणी प्यायल्याने नंतर देखील वारंवार तहान लागते. यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेऊया.
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांना वारंवार पाणी प्यावे लागते.
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर वारंवार पाणी प्यावे वाटते.
जर तुम्ही तेलकट पदार्थ खात असाल तर वारंवार पाणी प्यावे लागते.
वारंवार तहान लागण्यामागे अपुरी झोप हे एक कारण असू शकते.
तुम्ही कायम तणावाखाली राहत असाल तर वारंवार तहान लागू शकते.
तुम्ही जर जास्त औषधे घेत असाल तर वारंवार तहान लागू शकते.