रामायण-महाभारतात सूर्यास्तानंतर युद्ध का थांबत असे?

Aarti Badade

'प्राचीन युद्धांचा अनोखा नियम'

रामायण आणि महाभारतातील सर्व युद्धे फक्त दिवसा होत असत. सूर्यास्त झाला की युद्ध थांबत असे. पण असं का?

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'युद्ध म्हणजे सन्मानाची लढाई'

तेव्हा युद्ध ही फक्त ताकदीची नाही, तर नियमांची आणि सन्मानाची लढाई होती. त्याला धर्मयुद्ध म्हणत.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'एक महत्त्वाचा नियम'

या धर्मयुद्धाचा एक मोठा नियम होता – सूर्यास्तानंतर शस्त्र न उचलणे.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'सर्व योद्धे हा नियम मानत'

भीष्म, कर्ण, अर्जुन असो की राम आणि रावण – सर्व योद्धे संध्याकाळनंतर युद्ध थांबवत.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'अंधारात धोका अधिक'

त्या काळी दिवे नव्हते. अंधारात शत्रू-मैत्र असा फरक करणं कठीण होतं. चुकून आपला माणूस मारला जाण्याची शक्यता होती.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'धोखा टाळण्यासाठी हा नियम'

रात्री युद्ध करणे म्हणजे छुपा हल्ला – जो फितुरी मानला जाई. त्यामुळे रात्री युद्ध न करण्याचा नियम होता.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'सैनिकांची विश्रांतीही गरजेची'

घंटाभराचे नव्हे, तर दीर्घ युद्ध चालायचे. सैनिकांना विश्रांती, जेवण आणि पुनर्प्रशिक्षणाची गरज असायची.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'राजांची रणनीती'

रात्रीचा वेळ वापरला जायचा पुढच्या दिवशीच्या रणनीती ठरवण्यासाठी.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'ग्रंथांमध्ये उल्लेख'

रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्याचे अनेक संदर्भ आहेत.

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

'युद्धातही असायचे मूल्य आणि मर्यादा'

शत्रूवर विजय मिळवतानाही त्याकडे नैतिकता आणि नियमांचे पालन करत पाहिले जायचे. हेच होते धर्मयुद्धाचे खरे रूप!

Ramayana & Mahabharat war rule | Sakal

प्रामाणिक पाक पत्रकार , ज्याच्यामुळे इंदिरा गांधींना पाकिस्तानचे दोन तुकडे करणे शक्य झाले

Bangladesh history | Sakal
येथे क्लिक करा