Aarti Badade
भारतीय संस्कृतीत पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा स्वतःचा अर्थ आणि उपयोग असतो.
धुतलेला तांदूळ आणि कुंकू एकत्र करून अक्षता तयार होतात. त्या देवाला वाहतात, हे शुभतेचे प्रतीक आहे. शिजवला की तो भात बनतो, जो अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे.
दिवा म्हणजे प्रकाश. तूप म्हणजे भक्ती आणि प्रेम. हा दिवा मनातील अंधार दूर करण्याचे प्रतीक आहे.
नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे. तो पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. नारळ देवतेला अर्पण केला जातो.
गोड पदार्थाचा नैवेद्य म्हणजे शिरा. प्रसाद म्हणजे देवाच्या कृपेचा भाग. तो एकत्र येण्याचे प्रतीक आहे.
हळद म्हणजे सौभाग्य आणि पावित्र्य. ती पूजेत शुभ कामांसाठी वापरली जाते. ती शांततेचे प्रतीक आहे.
नागवेलीची पाने शुद्धता आणि ताजेपणाचे प्रतीक आहेत. विघ्नहर्ता गणपतीच्या पूजेत ती खूप महत्त्वाची मानली जातात. घरच्या पूजांमध्येही ती वापरतात.
अखंड सुपारी स्थैर्य आणि अखंडता दाखवते. पूजेत तिला विसरता येत नाही. वडिलधाऱ्यांना पान-सुपारी देऊन त्यांचा सन्मान व्यक्त केला जातो.
पान-सुपारी देणे म्हणजे आमंत्रण, शुभेच्छा आणि आदर व्यक्त करणे. ती मंगलकार्यात देवतेला आणि पाहुण्यांना दिली जाते.
प्रत्येक वस्तूमागे धार्मिक आणि मानसिक शुद्धतेचा अर्थ आहे. भारतीय पूजाविधी हा भावनांचा, प्रतीकांचा आणि भक्तीचा संगम आहे.