Payal Naik
तुम्ही आजवर अनेक मंदिरांमध्ये गेला असाल. आपली देवाप्रतीची श्रद्धा आणि भक्ती मंदिरांमध्ये जाऊन द्विगुणित होते.
मंदिरात देवांचं दर्शन केल्याने मनाला वेगळीच शांतता मिळते. त्या जागांवर असलेल्या ऊर्जा तरंगांमुळे असं घडतं.
मात्र बहुतांश पुरातन मंदिरं ही उंच डोंगरांवर बांधलेली असतात.
जम्मूतील माता वैष्णोदेवीचे मंदिर असो, किंवा गुवाहाटीतील माँ कामाख्याचे मंदिर असो, सगळेच मंदिरं हे डोंगरावरच वसलेले आहे.
महाराष्ट्रातीलही अनेक मंदीर ही उंच डोंगरांवर आहेत. असं का? त्यामागे शास्त्रीय कारण आहे.
देवाचं दर्शन हवं असेल तर त्यासाठी वर चढून जाणं गरजेचं असतं.
मात्र देव हा त्या मंदिरांसोबतच तुमच्या येण्याच्या मार्गातही असतो. वर चढायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला फक्त वरचा रस्ता दिसत राहतो.
आपण फक्त देवापर्यंत पोहोचण्याचा विचार करतो. इतर सगळे विचार आपल्या डोक्यातून निघून जातात.
यालाच ध्यान करणं म्हणतात. वर जाण्याचा एकच विचार आपल्या मनात असतो. आपण सतत तेच ध्यान करत असतो. त्यातच खरा देव असतो.
त्या ध्यानस्थ अवस्थेत मंदिरात पोहोचल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन घेऊन जास्त छान वाटतं. फ्रेश वाटतं कारण मनातले सगळे नकारात्मक विचार गायब झालेले असतात.
माणसाला ध्यान करणं, मनन करणं यांचं महत्व शिकवण्यासाठी मंदिरं ही इतक्या वर बांधली गेली आहेत.
म्हणून झालेलं प्राजक्ता माळीचं ब्रेकअप; म्हणाली- मी त्याला रंगेहात...