Yashwant Kshirsagar
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. औरंगजेबाच्या कबर ही संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असून या कबरीवर सब्जाचे रोप लावले जाते, यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेऊया.
औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आत्ताच्या औरंगाबादमधील( छत्रपती संभाजीनगर) खुलताबादला आणण्यात आला.
आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं.त्यामुळे त्याचा मृतदेह इथे आणण्यात आला.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलगा आझमशहा याने दक्षिणेकडील इस्लामचा गड असलेल्या खुलताबादेत ही कबर बांधली.
आपली कबर कशी असावी हे औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात सविस्तर लिहून ठेवले होते.
माझी जी कबर बांधाल, ती मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची असे औरंगजेबाने मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे.
औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या, तसंच तो कुराण शरीफ लिहायचा. त्यात जी कमाई झाली त्यातूनच त्याची खुलताबादमध्ये कबर बांधण्यात आली.
कबरीवर सब्जाचे रोप देखील लावण्यात यावे आणि वरती कोणतेही छत नसावे अशी इच्छा औरंगजेबाने मृत्यूपत्रात व्यक्त केली होती. त्यानुसार त्याच्या कबरीवर सब्जाचे रोप लावले जाते.