औरंगजेबचं काळीज अन् आतडे 'या' गावात का केले दफन?

संतोष कानडे

मुघल सम्राट

मुघल सम्राट औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च १७०७ रोजी अहिल्यानगरजवळील भिंगार येथील लष्करी छावणीत झाला.

औरंगजेब

औरंगजेबाची शेवटची इच्छा खुलताबाद येथे सुफी संत शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ दफन होण्याची होती.

भिंगार

भिंगार ते खुलताबाद हे अंतर सुमारे ११० ते १२० किलोमीटर आहे. सैन्याच्या ताफ्याला ते पार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागणार होता.

मृतदेह

मार्च महिन्यातील कडक उन्हाळा आणि प्रवासाचा वेळ पाहता मृतदेह खराब होऊ नये म्हणून तत्कालीन प्रथेनुसार शव जतन प्रक्रिया करण्यात आली.

काळीज

मृतदेह कुजण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील सर्वात आधी खराब होणारे अंतर्गत अवयव जसे की काळीज, आतडे आणि जठर शरीराबाहेर काढण्यात आले.

लष्करी छावणी

हे सर्व अंतर्गत अवयव तातडीने भिंगार येथील लष्करी छावणीतील मशिदीसमोरील चौथऱ्यात पुरण्यात आले.

चौथरा

ज्या ठिकाणी हे अवयव दफन केले गेले, त्या जागेवर एक लहान चौथरा बांधला गेला, ज्या परिसराला आजही स्थानिक पातळीवर आलमगीर म्हणून ओळखले जाते.

सुगंधी द्रव्ये

अंतर्गत अवयव काढल्यानंतर उर्वरित शरीरावर सुगंधी द्रव्ये व रसायनांचा लेप लावून ते सुरक्षितपणे खुलताबादला नेण्यात आले.

खुलताबाद

यामुळेच औरंगजेबाची मुख्य आणि अधिकृत कबर केवळ खुलताबाद येथेच आहे, भिंगार येथे केवळ अंतर्गत अवयव पुरलेले आहेत.

इतिहासकार

ब्रिटिशकालीन गॅझेटिअर्स आणि इतर ग्रंथांमध्ये या घटनांचे उल्लेख आढळून येतात.

चातक पक्षी खरंच फक्त पावसाचं पाणी पितो?

<strong>येथे क्लिक करा</strong>