देवपूजेत का लावतात कापूर? जाणून घ्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

सकाळ डिजिटल टीम

कापूर

देवपूजेत कापूर का लावला जातो काय आहेत या मगची अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं जाणून घ्या.

camphor in puja | sakal

आध्यात्मिक महत्त्व

कापूर स्वतः जळून जातो आणि कोणतीही राख मागे ठेवत नाही. हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे, जिथे अहंकार (Ego) पूर्णपणे जळून देवामध्ये विलीन होतो आणि मागे काहीही उरत नाही.

camphor in puja | sakal

ईश्वराशी एकरूपता

कापूर जळाल्यावर त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. हे आत्म्याने ईश्वराशी एकरूप होऊन सर्वत्र आपले अस्तित्व पसरवण्याचे प्रतीक मानले जाते.

camphor in puja | sakal

पवित्रता आणि शुद्धीकरण

आरतीच्या वेळी कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. त्याची ज्योत ही नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, ज्यामुळे मन शांत होते.

camphor in puja | sakal

ज्ञानाचा प्रकाश

कापूरची ज्योत ही दैवी प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि जीवनात ज्ञान व प्रकाश आणतो. असे म्हंटले जाते.

camphor in puja | sakal

पंचमहाभूतांचा संगम

कापूर जाळल्यावर तो घन (Solid) अवस्थेतून थेट वायू (Gas) अवस्थेत जातो, ज्यामुळे अग्नी, वायू आणि आकाश या तीन तत्त्वांचा अनुभव येतो. पाणी आणि पृथ्वी या तत्त्वांचा समावेश पूजेतील इतर वस्तूंमध्ये असतो, ज्यामुळे पंचमहाभूतांचा संगम पूर्ण होतो. असे मानले जाते.

camphor in puja | sakal

वैज्ञानिक महत्त्व

कापूरमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. तो जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. विशेषतः, धार्मिक स्थळे किंवा बंद ठिकाणी कापूर जाळल्याने वातावरण स्वच्छ आणि निर्जंतुक होते.

camphor in puja | sakal

श्वसनमार्गासाठी फायदेशीर

कापूरचा सुगंध श्वसनमार्गासाठी फायदेशीर असतो. त्याचा वास घेतल्याने सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास होणाऱ्या अडचणी कमी होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

camphor in puja | sakal

सकारात्मक दृष्टिकोन

कापरा मधील सकारात्मक ऊर्जा आणि त्याचा सुगंध मानसिक स्तरावर काम करतो. यामुळे मनात निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात आणि एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.

camphor in puja | sakal

बासरी का आहे श्री कृष्णांची ओळख?

Lord Krishna | sakal
येथे क्लिक करा