पुण्याऐवजी शिवरायांनी रायगडाला राजधानी का बनवलं? या व्यक्तीने दिलेला सल्ला

सकाळ वृत्तसेवा

शिवराय आणि रायगड

शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी म्हणून का निवडला? यामागे त्यांचे वडील शहाजी राजांचा मोलाचा सल्ला होता!

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शिवरायांची आक्रमक भूमिका

इ.स. १६६२ मध्ये शिवरायांच्या वाढत्या आक्रमकतेमुळे विजापूरकर घाबरले. त्यांनी शहाजी राजांना मध्यस्थीसाठी पाठवले.

Chhatrapati Shivaji Maharaj | ESakal

पिता-पुत्र भेटीचा क्षण

शिवाजी महाराज आणि शहाजी राजे यांची १२ वर्षांनी भेट झाली. ही भेट ऐतिहासिक आणि खूप महत्त्वाची ठरली.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शहाजी राजांचा अनुभव

शहाजी राजांना दख्खनमधील चाळीस वर्षांचा अनुभव होता – युद्धकला, राज्यकारभार आणि राजकारणातील सखोल ज्ञान त्यांना होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj and | Sakal

भविष्यातील राजधानीची चर्चा

या पिता-पुत्रांनी मराठी राज्यासाठी कायमस्वरूपी राजधानी कुठे असावी, यावर सखोल चर्चा केली.

Chhatrapati Shivaji Maharaj | ESakal

पुणे आणि कल्याण मोगलांच्या ताब्यात

त्यावेळी पुणे आणि कल्याण मोगलांच्या ताब्यात होते, त्यामुळे ते राजधानीसाठी योग्य नव्हते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

रायगडावर निवड

नाशिक, बेळगाव भागाची पाहणी केल्यावर रायगडाचा पर्याय निश्चित झाला. महाडजवळचा हा दुर्गम किल्ला योग्य ठरला.

Chhatrapati Shivaji Maharaj | ESakal

राजधानीची पायाभरणी

रायगडावर तटबंदी आणि इमारतींचे बांधकाम सुरू झाले. इ.स. १६६६ मध्ये शिवराय आग्र्याहून परतल्यावर रायगड राजधानी म्हणून जाहीर झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

रायगडाचे बदललेले स्वरूप

इ.स. १६६४ पासूनच रायगडाचे रूप बदलले – तो एक भक्कम किल्ला, सुंदर वास्तू आणि मजबूत तटबंदी असलेला प्रदेश बनला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

वडिलांचा मोलाचा सल्ला

शहाजी राजांचा सल्ला आणि अनुभवामुळेच शिवाजी महाराजांनी रायगडाला राजधानीचे महत्त्वाचे स्थान दिले!

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मुघलांची सर्वात सुंदर राजकुमारी, पॉकेटमनी फक्त २ कोटी रुपये

jahan aara | esakal
येथे क्लिक करा