Aarti Badade
वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या वेदनांपासून स्वतःचा बचाव कसा कराल, हे जाणून घ्या.
पावसात वातावरणातील दाब कमी होतो, त्यामुळे सांध्यांमध्ये सूज येते आणि वेदना वाढतात.
थंड व दमट हवेमुळे सांध्यातील ऊती आकुंचन पावतात, त्यामुळे त्रास वाढतो.
पावसाळ्यात रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे स्नायू आणि सांधेदुखीची तीव्रता वाढते.
ज्यांना संधिवात आहे किंवा जुनी दुखापत आहे त्यांना पावसाळ्यात त्रास अधिक होतो.
अति चालणे, चुकीची हालचाल, पोश्चर किंवा इतर आरोग्याच्या समस्या देखील कारणीभूत होऊ शकतात.
कोमट पाण्याने पायांना शेक दिल्यास आराम मिळतो व सूज कमी होते.
रक्तप्रवाह सुधारतो, थकवा कमी होतो आणि संधी व स्नायू वेदनांवर आराम मिळतो.
पाय दुखत असताना जास्त वेळ चालणे किंवा उभे राहणे टाळा.
वेदना जर दीर्घकाळ टिकत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सांधेदुखी लहानशी वाटली तरी वेळेत काळजी घ्या आणि सवयी सुधारित ठेवा.