Aarti Badade
उन्हाळ्यात हवा कोरडी आणि उष्ण असल्यामुळे नाकातील नाजूक रक्तवाहिन्यांमध्ये दाब येतो आणि रक्त येऊ शकते.
तासन्तास उन्हात राहिल्यास शरीराचे तापमान वाढते, यामुळे नाकातून अचानक रक्त येऊ शकते.
पाणी कमी प्यायल्यास शरीरातील रक्त घट्ट होते आणि त्यामुळे नाकातून रक्त येण्याची शक्यता वाढते.
नाकात सतत बोट घातल्याने किंवा खवखवल्याने आतील त्वचा फाटते आणि रक्तस्त्राव होतो.
सर्दी किंवा एलर्जीमुळे नाकात सूज येते, तर साइनस संसर्गामुळे खवले तयार होतात – यामुळेही रक्त वाहू शकते.
डोक्यावर थंड पाणी टाका किंवा बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळून नाकाजवळ ठेवा – रक्तस्त्राव लगेच थांबतो.
कांद्याचा वास घेतल्याने किंवा बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीर शीत राहते आणि रक्त येणे कमी होते.
भरपूर पाणी प्या, उन्हात कमी वेळ राहा. जर रक्त येणे सतत सुरूच राहिलं, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.