देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, पण स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधानच का लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात?

Mansi Khambe

१५ ऑगस्ट

१५ ऑगस्ट हा दिवस देशातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता.

Flag Hosting | ESakal

७९वा स्वातंत्र्यदिन

आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती संघर्ष केला. यंदा भारत ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

Flag Hosting | ESakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेंडा फडकावला आहे. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले आहे.

Flag Hosting | ESakal

पंतप्रधान ध्वजारोहण का करतात?

पण १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती सर्वोच्च पदावर असताना केवळ पंतप्रधानच ध्वजारोहण का करतात? कारण देशाचा पहिला नागरिक तर राष्ट्रपती असतो. हा प्रश्न तुमच्या मनात आला आहे का?

Flag Hosting | ESakal

सर्वोच्च पद पंतप्रधानांचे

खरंतर, १९४७ मध्ये आपल्या देशाचे संविधान तयार नव्हते आणि त्यावेळी भारतातील सर्वोच्च पद पंतप्रधानांचे होते. म्हणूनच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशात पहिल्यांदाच ध्वजारोहण केले.

Flag Hosting | ESakal

पंडित नेहरू

१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पोहोचू न शकल्यामुळे, १६ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्याच्या लाहोर गेटवरून ध्वजारोहण केले. तसेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

Flag Hosting | ESakal

भारतीय ध्वज

तेव्हापासून, १५ ऑगस्ट रोजी देशाचे फक्त पंतप्रधानच ध्वजारोहण करत आहेत. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तीन पट्टे आणि मध्यभागी अशोक चक्र असलेला भारतीय ध्वज स्वीकारला.

Flag Hosting | ESakal

पिंगली वेंकय्या

भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली वेंकय्या यांनी डिझाइन केला होता. ते आंध्र प्रदेशातील एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.

Flag Hosting | Esakal

पहिला भारतीय राष्ट्रीय

भारतातील पहिला भारतीय राष्ट्रीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकाता येथील पारसी बागान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे फडकवण्यात आला.

Flag Hosting | ESakal

कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान आडव्या रेषा का असतात?

Keyboard | ESakal
येथे क्लिक करा