संतोष कानडे
लोहगड किल्ल्याची मजबूत तटबंदी, उंच डोंगरावरील स्थान आणि शत्रूला सहज जिंकता न येणारी रचना यामुळे या किल्ल्याचं नाव 'लोहगड' असं पडल्याचं मानलं जातं.
लोहगड या शब्दाचा अर्थ "लोह" म्हणजे आणि "गड" म्हणजे किल्ला असा होतो, म्हणजेच लोखंडासारखा अभेद्य किल्ला.
या किल्ल्याला नेमक्या कोणत्या राजाने किंवा व्यक्तीने "लोहगड" असे नाव दिले, याची स्पष्ट ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही.
इतिहासकारांच्या मते हे नाव किल्ल्याच्या अभेद्य स्वरूपामुळे लोकपरंपरेतून रूढ झाले असावे.
लोहगडाचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते.
या किल्ल्यावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे आणि पेशवे अशा अनेक राजवटींचे राज्य होते.
इ.स. १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला आणि त्याचे लष्करी महत्त्व अधिक वाढले.
सुरतेच्या मोहिमेनंतर मिळालेल्या संपत्तीचा काही भाग लोहगडावर सुरक्षित ठेवण्यात आल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात.
भोर घाटावरील नियंत्रण आणि मजबूत संरक्षणामुळे लोहगड स्वराज्यातील महत्त्वाचा रणनीतिक किल्ला बनला.
आजही लोहगड हा आपल्या अभेद्य रचनेमुळे आणि समृद्ध इतिहासामुळे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक मानला जातो.