संतोष कानडे
गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर शरीर नष्ट होते, परंतु आत्मा अमर असून त्याचा पुढील प्रवास सुरू राहतो.
हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हा सोळा संस्कारांपैकी शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो.
पारंपरिक मान्यतेनुसार, अंत्यविधीनंतर स्मशानातून परतताना मागे वळून पाहू नये, अशी प्रथा आहे.
या श्रद्धेमागील कारण असे सांगितले जाते की, मागे वळून पाहिल्यास मृतात्म्याची कुटुंबावरील आसक्ती वाढू शकते.
त्यामुळे आत्म्याच्या पुढील प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी गरुड पुराणातील धार्मिक समजूत आहे.
म्हणूनच मृतात्म्याला सद्गती आणि शांती लाभावी यासाठी कुटुंबीयांनी काही धार्मिक विधी पार पाडण्याची परंपरा आहे.
गीतेत श्रीकृष्ण सांगतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि अमर आहे.
या श्रद्धा प्रामुख्याने धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरांवर आधारित आहेत; त्यांना वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
भारतातील अनेक भागांत आजही या परंपरा श्रद्धेने पाळल्या जातात आणि त्यांना सांस्कृतिक महत्त्व आहे.
त्यामुळे अंत्यविधीनंतर मागे वळून न पाहण्याची प्रथा ही मृतात्म्याविषयी आदर, विरक्ती आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानली जाते.