सकाळ डिजिटल टीम
तृणमूल काँग्रेसला आमदारानंतर खासदारांनीही धक्का दिला आहे. स्थापनेला २८ वर्षे झाल्यानंतर आता ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष संकटात आहे.
Mamata Banerjee
Esakal
गेल्या १५ वर्षांपासून तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेत होते. मात्र भाजपने विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्येही मोठी फूट पडलीय.
Mamata Banerjee
Esakal
ममता बॅनर्जींनी त्यांची राजकीय कारकिर्द विद्यार्थीदशेपासून सुरू केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रवेश करत १९८४मध्ये खासदार बनल्या होत्या.
Mamata Banerjee
Esakal
१९९०मध्ये डाव्यांविरोधात ममता बॅनर्जींनी घेतलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसकडून अडवणूक होत असल्याचं त्यांना वाटलं.
Mamata Banerjee
Esakal
ममता बॅनर्जींनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिल्यानंर १९९७मध्ये काँग्रेसनं त्यांची हकालपट्टी केली.
Mamata Banerjee
Esakal
ममता बॅनर्जींनी मुकुल रॉय यांसारख्या नेत्यांसोबत मिळून १९९८मध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.
Mamata Banerjee
Esakal
१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने एनडीएसोबत मिळून ८ जागा जिंकल्या होत्या. तेव्हाच्या सरकारमध्ये केंद्रात ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या.
Mamata Banerjee
Esakal
२०११ च्या विधानसभा निवडणुकी तृणमूल काँग्रेसने काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवत डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता उलथवली होती.
Mamata Banerjee
Esakal
ममतांनी डाव्यांचा गढ उद्ध्वस्त केल्यानंत राज्यात १५ वर्षे सत्ता राखली. पण भाजपने ममतांच्या सत्तेला २०२६च्या निवडणुकीत सुरुंग लावला.
Mamata Banerjee
Esakal
CNG Cars
Esakal