सकाळ वृत्तसेवा
हिवाळ्यात आरोग्यासाठी विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याकडे नागरिकांचा कल असतो.
थंडीच्या दिवसात खोबरे आणि डिंकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगल राखण्यासाठी फायदेशीर आहे.
डिंकाचे लाडू बनवण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारीक, खोबरे यांना मागणी आहे. कारण, थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते.
यंदा सततच्या वातावरणाच्या बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे.
भारतात जास्त प्रमाणात सुकामेव्याची मागणी वाढली आहे. कारण, थंडीच्या दिवसात हाडांना मजबूत बनवण्यासाठी, बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
अतिउष्णता आणि अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले आहे.
झाडांवरून माल कमी निघाल्याने कच्च्या काजूचा तुटवडा झाला आहे.
आयात होत असलेला सुकामेवा यामुळे महागला आहे.