Aarti Badade
'स्वयंपूर्ण खेडं' हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. पुण्यातील टिकेकरवाडी गावाने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून देशासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
Tikekarwadi
Sakal
पुण्यापासून १२० किमी अंतरावर असलेल्या या गावाने वीज बचतीचे मोठे धोरण राबवले असून, सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनेल बसवले आहेत.
Tikekarwadi
Sakal
गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि पथदिव्यांसाठी लागणारी सर्व वीज सौरऊर्जेतून तयार केली जाते, ज्यामुळे वीज बिल आता 'शून्य' येते.
Tikekarwadi
Sakal
ग्रामपंचायतीने गावातच गोबर गॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे गावातील सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध झाला आहे.
Tikekarwadi
Sakal
गावाने 'ओला कचरा मुक्त गाव' हे ध्येय समोर ठेवून काम केले. या कचऱ्याचा वापर करून गॅस आणि नैसर्गिक खताची निर्मिती केली जाते.
Tikekarwadi
Sakal
गोबर गॅस प्रकल्पातून मिळणाऱ्या स्लरीचा वापर शेतीसाठी खत म्हणून केला जातो. यामुळे शेती आता रासायनिक खतांशिवाय बहरली असून उत्पादनातही वाढ झाली आहे.
Tikekarwadi
Sakal
टिकेकरवाडीच्या या आत्मनिर्भरतेचे आणि स्वच्छतेचे कौतुक थेट राष्ट्रपतींनीही केले आहे. अवघ्या ११०० लोकसंख्येच्या या गावाने मोठे बदल घडवले आहेत.
Tikekarwadi
Sakal
गावाचा कारभार विनाखर्च व्हावा आणि गाव स्वयंपूर्ण व्हावे हा ग्रामस्थांचा निर्धार आज यशस्वी झाला आहे.
Tikekarwadi
Sakal
Sunday Haldi tradition of Pal Village
Sakal