गर्भारपणात नारळाचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे...

नमिता धुरी

गर्भारपणात महिलांना पोषक तत्त्वांनी युक्त असा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यापैकीच एक आहे नारळाचे पाणी. नारळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्वे आणि क्षार असतात. त्यामुळे बाळाचे आणि आईचे आरोग्य चांगले राहाते.

बद्धकोष्ठतेपासून दिलासा

गर्भवती महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते. नारळाचे पाणी प्यायल्याने पचन चांगले होते व बद्धकोष्ठता जाणवत नाही.

थकवा दूर होईल

गर्भवती महिलांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा येते.

रोगप्रतिकारशक्ती

गर्भारपणात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका असतो. नारळाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

बाळाचा विकास

नारळाच्या पाण्यात विविध प्रकारची पोषक तत्त्वे असल्याने बाळाच्या विकासास मदत होते.

वजन नियंत्रणात

ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि फायबरने युक्त असलेल्या नारळाच्या पाण्यात कॅलरी नगण्य प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहाते.

अॅसिडीटी

नारळाचे पाणी प्यायल्याने अॅसिडीटीपासून दिलासा मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.