President Oath : कसा असतो राष्ट्रपतींचा शपथविधी, जाणून घ्या वैशिष्ट्ये

नमिता धुरी

११ फेब्रुवारी १९७७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे निधन झाले होते. ते आपला कार्यकाळ पूर्ण करू न शकणारे दुसरे राष्ट्रपती ठरले. त्यानंतर २५ जुलै १९७७ रोजी नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती बनले व त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. तेव्हापासून २५ जुलै हाच राष्ट्रपतींच्या शपथविधीचा दिवस निश्चित झाला.

राष्ट्रपतींची शपथ

"मी (नाव) देवाची शपथ घेते की, मी भारताच्या राष्ट्रपती पदाचा प्रामाणिकपणे वापर करीन आणि माझ्या क्षमतेनुसार संविधान आणि कायद्याचे रक्षण, संरक्षण करीन आणि मी भारतातील लोकांची सेवा करीन आणि मी कल्याण करत राहीन."

शपथविधी सोहळ्यादरम्यान राष्ट्रपती भवनात देशातील मान्यवर उपस्थित असतात. भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. यानंतर राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाते. यानंतर राष्ट्रपती देशाचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री यांची भेट घेतात.

राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख असतात. नवा कायदा तयार करताना त्याचा मसुदा राष्ट्रपतींसमोर मंजुरीसाठी येतो. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होते. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचे दयेचे अर्जही राष्ट्रपतींसमोर मंजुरीसाठी येतात.

भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे सल्लागार, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, सर्व निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षक, परदेशात भारतीय राजदूतांची नियुक्ती यांच्या नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतींकडे असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.