Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे एक संपूर्ण राज्य उभं केलं. त्यांनी लोकांना एकत्र आणून त्यांना योग्य दिशा दिली आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं.
शिवाजी महाराजांना त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता. कोणत्याही संकटात त्यांनी आत्मविश्वास न सोडता त्यातून मार्ग काढला.
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी असाधारण होती. त्यांनी भविष्यातील संधी आणि आव्हानांचा अंदाज घेतला आणि त्यानुसार आपली योजना आखली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच शांततेने आणि विचारपूर्वक निर्णय घेतले. कोणत्याही संकटाच्या वेळी त्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कसंगत विचार केला.
त्यांनी आपल्या साम्राज्याचं उत्तम व्यवस्थापन केलं. त्यांचे किल्ले, लष्कर, प्रशासन हे सर्व अत्यंत उत्तम प्रकारे व्यवस्थापित होतं.
शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकजुटीने काम केलं. त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वानुसार संधी दिली आणि त्यांची मदत घेतली.
शिवाजी महाराजांनी आपल्या वेळेचं महत्त्व ओळखलं. त्यांनी वेळेचं योग्य नियोजन केलं आणि ते फॉलो केलं.
त्यांनी वेळेचं उत्तम व्यवस्थापन केलं. त्यांनी आपल्या कार्यात कधीच उशीर होऊ दिला नाही आणि वेळेवर आपल्या कामांना पूर्ण केलं.
शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यासाठी दीर्घकालीन विचार केला. त्यांनी आपल्या राज्याच्या भविष्याची योजना आखली आणि त्यानुसार पावलं उचलली.
शिवाजी महाराजांनी आपल्या करिअरची छोटी सुरुवात केली. त्यांनी आपल्या साम्राज्याची स्थापना एका लहानशा किल्ल्यापासून केली आणि नंतर हळूहळू विस्तार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.