१५ ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन का? तारीख ठरवण्यामागची रंजक कहाणी!

सकाळ डिजिटल टीम

सुरुवातीला १५ ऑगस्ट ठरलेलंच नव्हतं!

ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटली यांनी फेब्रुवारी १९४७ मध्ये भारतातील ब्रिटिश सत्ता जून १९४८ पर्यंत संपवण्याची घोषणा केली होती. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याची अंतिम मुदत सुरुवातीला १९४७ नव्हती.

माउंटबॅटन भारतात आले अन् सगळं बदललं!

मार्च १९४७ मध्ये लॉर्ड लुई माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हाइसरॉय म्हणून आले. देशातील वाढता तणाव आणि फाळणीची परिस्थिती पाहता सत्ता हस्तांतरण लवकर करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे १९४८ची वाट न पाहता १९४७मध्येच सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पुढे गेली.

मग अचानक १५ ऑगस्ट ही तारीख आली कुठून?

माउंटबॅटन यांना सत्ता हस्तांतरणाची तारीख विचारण्यात आली तेव्हा त्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरच्या आसपासची तारीख मनात असल्याचे सांगितले. नंतर त्यांनी १५ ऑगस्ट निवडल्याचे सांगितले. त्यांच्या स्वतःच्या कथनानुसार, ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण होतं.

१५ ऑगस्टचा जपानशी काय संबंध?

१५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या सम्राट हिरोहितो यांनी रेडिओ संदेशातून मित्रराष्ट्रांसमोर जपानच्या शरणागतीची घोषणा केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात माउंटबॅटन दक्षिण-पूर्व आशियातील मित्रराष्ट्रांच्या सैन्याचे सर्वोच्च कमांडर होते. म्हणूनच १५ ऑगस्ट ही तारीख माउंटबॅटन यांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची होती, असे त्यांनी नंतर सांगितले.

ब्रिटिश संसदेत कायदा झाला... तारीख पक्की झाली!

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा म्हणजे Indian Independence Act, 1947 ब्रिटिश संसदेत मंजूर झाला. या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ हा भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र डॉमिनियनच्या स्थापनेचा अधिकृत दिवस ठरवण्यात आला. कायद्याला १८ जुलै १९४७ रोजी राजमंजुरी मिळाली.

अखेर १५ ऑगस्ट १९४७ची मध्यरात्र आली!

१४ ऑगस्टची रात्र सरत असताना दिल्लीमध्ये स्वातंत्र्य सोहळ्याची तयारी सुरू होती. मध्यरात्री सत्ता हस्तांतरण झाले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पुढच्या दिवशी लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.