महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह; जातीभेद नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी उचललं महत्त्वपूर्ण पाऊल!

सकाळ डिजिटल टीम

Chavdar Tale Satyagraha : तब्बल पाच हजार बांधवांना आपल्या सोबत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Babasaheb Ambedkar) महाडचं चवदार तळं गाठलं आणि त्या तलावाचं पाणी पिऊन हिंदू धर्मातला जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं.

Babasaheb Ambedkar Chavdar Tale Satyagraha Mahad

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 साली झाला. आज 20 मार्च 2024 रोजी त्या घटनेला जवळपास 96 वर्ष पूर्ण होत आहेत.

Babasaheb Ambedkar Chavdar Tale Satyagraha Mahad

महाडच्या चवदार तळ्याचं पाणी त्या काळी समाजातल्या काही प्रतिष्ठीत घटकांसाठीच मर्यादित होतं.

Babasaheb Ambedkar Chavdar Tale Satyagraha Mahad

इतर कोणीही तिथं जाऊ शकत नसे. ही बाब डॉ. आंबेडकरांच्या निदर्शनास आली. त्यात आंबेडकरांना त्यावेळच्या उच्च घटकातल्या काही महत्वाच्या व्यक्तींचीही साथ मिळाली.

Babasaheb Ambedkar Chavdar Tale Satyagraha Mahad

त्यावेळी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेब यांनी आपल्या ओंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला.

Babasaheb Ambedkar Chavdar Tale Satyagraha Mahad

या सत्याग्रहानंतर हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही ओळखला जातो.

Babasaheb Ambedkar Chavdar Tale Satyagraha Mahad

India National Flag : देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज पुन्हा उतरविला; काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.