सकाळ डिजिटल टीम
अनुराग कश्यप यांनी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूडमधील बदलत्या प्रवृत्तीने त्यांना अस्वस्थ केलं असून, त्यांनी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुराग कश्यप यांनी अलीकडेच बॉलीवूडमधील नफेखोरीवर जाहीर नाराजी व्यक्त केली.
त्यांचं म्हणणं आहे की, सध्या चित्रपटांच्या गुणवत्तेपेक्षा व्यावसायिक यशाला जास्त महत्त्व दिलं जातं आहे.
निर्माते फक्त चित्रपट विक्रीवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे सर्जनशीलता आणि कलात्मकता हरवत चालली आहे.
या वातावरणामुळे निर्मितीची आनंददायी प्रक्रिया संपल्याची भावना जाणवते असे म्हटले आहे.
या परिस्थितीमुळे अनुराग दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं नशीब अजमावण्याचा विचार करत आहेत.
त्यांच्या मते, दक्षिणेत सर्जनशीलता अधिक जोपासली जाते आणि कलाकारांना स्वतंत्र दृष्टिकोन मांडण्यासाठी पुरेशी संधी मिळते. यासाठी प्राथमिक चर्चा सुरू केल्याचंही समजते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.