राहुल शेळके
सन 1973-74 चा अर्थसंकल्प 'ब्लॅक बजेट' म्हणून ओळखला जातो. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध, खराब मान्सून आणि आर्थिक संकटामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.
या संकटाच्या वेळी देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि सरकारला विशेष उपाययोजनांची गरज होती.
त्यावेळी देशाच्या विकासाची रूपरेषा सांगणारा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती.
देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर आणि सकारात्मक पावले उचलण्याची गरज होती. त्यासाठी त्यांनी 'ब्लॅक बजेट' सादर केले, ज्यामध्ये देशासाठी आवश्यक बदल सुचवण्यात आले होते.
अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, देशात दुष्काळ आणि अन्नधान्य उत्पादनात झालेली घट यामुळे अर्थसंकल्पात 550 कोटी रुपयांची तूट आहे. म्हणून, याला ‘ब्लॅक बजेट’ म्हटले गेले
जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा सरकारला बजेटमध्ये कपात करावी लागते. अशा अर्थसंकल्पाला 'ब्लॅक बजेट' म्हणतात.
समजा सरकारची कमाई 200 रुपये आहे आणि त्याचा खर्च 250 रुपये आहे, तर ही तूट भरून काढण्यासाठी सरकार आपल्या बजेटमध्ये अनेक कपात करते. अशा अर्थसंकल्पाला 'ब्लॅक बजेट' म्हणतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.