सकाळ डिजिटल टीम
भारत जोडो यात्रेपासून राहूल गांधी चांगलेच चर्चेत आहे.
या यात्रेदरम्यानच्या अनेक व्हायरल फोटो आणि व्हिडीओमुळे ते चांगलेच प्रकाश झोतात आले होते.
आता त्यांनी केलेल्या एका धक्कादायक खुलासामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
या वेळी त्यांनी भारत जोडो यात्रेतील काही आठवणी शेअर केल्या.
यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घराबद्दल उल्लेख केला.
"52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही. आमच्या कुटुंबाचे घर अलाहाबादमध्ये आहे पण तेही आमचं घर नाही. 120 तुघलक लेन माझे घर नाही", असं राहूल गांधी म्हणाले
पण भारत जोडो यात्रा हे माझ्यासाठी एका घराप्रमाणे होतं, असंही ते म्हणाले.
त्यांच्याकडे ५२ वर्षांपासून घर नाही , या विधानावरुन ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सध्या राहूल गांधी येत्या निवडणूकीत भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.