साक्षी राऊत
मधुमेह असल्यास तुम्हाला वारंवार लघवीचा त्रास जाणवू शकतो.
वारंवार लघवीमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागते. पाणी पिऊनही तुमची तहान भागत नाही.
मधुमेहामुळे ग्लुकोज योग्यप्रकारे शोषून घेतले जात नाही. आणि शरीरात उर्जेची कमतरता जाणवते. ज्यामुळे व्यक्तीस वारंवार भूक लागते.
जेव्हा शरीरात जेवणाने पुरेशी उर्जा निर्माण होत नाही तेव्हा मांसपेशी आणि फॅट वितळण्यास सुरुवात होते. परिणामी तुमचे वजन कमी होते.
शरीरात अन्न आणि ग्लुकोज शोषून घेतले जात नसल्या कारणाने अशक्तपणा जाणवतो.
खराब ब्लड सर्क्युलेशन आणि नर्व्ह डॅमेजमुळे तुमचे हात पाय सुन्न पडू शकतात.
शरीरात ब्लड शुगर लेव्हल लाढल्यास डोळ्यांनी अंधुक दिसू लागतं.
रक्तात इंसुलिनचे प्रमाण वाढल्यास मान, कंबर आणि शरीराच्या इतर भागांवर काळे डाग पडू लागतात.
शरीरात वारंवार इन्फेक्शन होणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.